बुधवार, १९ एप्रिल, २०१७

"कसं जगावं पोशिंद्याने?"

वेग वाढतोय विकासाचा झपाट्याने,
जग बदलतंय आपलं दर सेकंदाने।
बघ डोकावून आजूबाजूला मित्रा,
ऐकू येईल कुणाचेतरी आर्त रडणे।।

कोण आहे हा रडणारा, व्याकुळणारा?
हा तोचि पोशिंदा सर्वांना पोसणारा।
भरुनी सर्वांचे पोट दरदिवशी नित्याने,
स्वतः मात्र रात्रंदिस उपाशी राहणारा।।

बळीराजाचे आहे हे रडणे,हि व्यथा,
महागाईने जीव घेतला, दरडोईची हि कथा।
पिकवलेल्या पिकाला भाव नाही आता,
माझ्या भारतीय शेतकऱ्यांची दुःखद गाथा।।

यास नसे भान सण अनं समारंभाचा,
दिसंरात हा सेवक फक्त  शिवाराचा।
घाम गाळून, कष्ट करूनी मातीत,
भाव पिकास नाही त्याच्या स्वेच्छेचा।।

अरे! हा तोच आहे माझा शेतकरी,
ताट स्वतःचे अर्धवट ठेवुनी इतरांचे भरी।
पिकवून पीक स्वतः शेतात कष्टाने,
मात्र भाव त्याचा राजकारणी करी।।

या पोशिंद्यावर होतं आज राजकारण,
का रे अडकूनी आहे स्वामिनाथन?
जगणे सुखद करावयाचे आहे आता,
चला मिळुनी करू यावर मंथन....
करू यावर मंथन!!



✍ © सागर बिसेन

२६/०२/२०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा